<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<!-- generator="FeedCreator 1.7.2" -->
<rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
    <channel>
        <atom:link href="http://esakal.yolasite.com/news/category/resources/news.rss" rel="self" type="application/rss+xml" />
        <title>news</title>
        <description>news</description>
        <link>http://esakal.yolasite.com/news/category/resources/news.php</link>
        <lastBuildDate>Sat, 13 Jun 2026 13:44:24 +0100</lastBuildDate>
        <generator>FeedCreator 1.7.2</generator>
        <item>
            <title>दूध पंढरीची जय्यत तयारी</title>
            <link>http://esakal.yolasite.com/news/category/resources/news/दूध-पंढरीची-जय्यत-तयारी</link>
            <description>कासेगाव - आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना जिल्हा दूध संघाच्या वतीने जादा स्टॉल उभारून 
दूध पुरविले जाणार आहे. वारीमध्ये अडीच ते तीन लाख लिटर दुधाची उलाढाल होईल, अशी 
माहिती विपणन अधिकारी सुहास गडदे यांनी &quot;सकाळ'ला दिली.&lt;br&gt;&lt;br&gt;यात्रेच्या नियोजनासाठी 
बार्शी, टेंभुर्णी, सोलापूर येथील जादा १०० कर्मचारी मागवून शिवाजी चौक दोन, अर्बन 
बॅंक एक तर इसबावी येथे चार स्टॉल उभारण्यात आले आहे. शहरातील ३५ एजन्सीद्वारे 
किरकोळ विक्रेत्यांना दुधाच्या पिशव्या तसेच पेढे पुरविण्यात येणार आहेत. यंदा 
आषाढी वारीमध्ये अडीच ते तीन लाख सुट्या व पिशवीतील दुधाची विक्री होणार आहे. ९ हजार किलो पेढ्याची विक्री होईल. तूप, श्रीखंड, आम्रखंड आदी मागणीनुसार पुरविले 
जाणार असल्याचेही श्री. गडदे यांनी सांगितले.</description>
            <pubDate>Sat, 09 Jul 2011 10:44:11 +0100</pubDate>
        </item>
        <item>
            <title>वारीतला अवघा बळीराजा सुखावला</title>
            <link>http://esakal.yolasite.com/news/category/resources/news/वारीतला-अवघा-बळीराजा-सुखावला</link>
            <description>&lt;table class=&quot;light_gray_table_text&quot; border=&quot;0&quot; cellspacing=&quot;0&quot; cellpadding=&quot;3&quot; width=&quot;100%&quot;&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td class=&quot;preview_big_text&quot; colspan=&quot;4&quot;&gt;सलग तीन दिवस पाऊस - आनंदाचे डोही आनंद तरंग.&lt;br&gt;&lt;br&gt;वेळापूर - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी 
सोहळ्यावर गेली तीन दिवसांपासून वरुणराजा बरसला. पावसामुळे गेल्या आठवडाभरात 
उकाड्याने हैराण झालेला वारकरी पाऊस आणि भक्तिरसात चिंब झाला. काहीशा काळजीत 
असलेल्या वारीतील बळीराज्याच्या चेहऱ्यावर होता तो आनंद, आनंद आणि आनंदच. 
सुखावलेल्या बळीराजाला आता गावाकडच्या शेतातील पेरणीची काळजी राहिली नाही. 
&lt;br&gt;&lt;br&gt;सोहळा आळंदीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्यावर सासवडपासून वारकरी 
उकाड्याने हैराण होते. त्यामुळे सर्वत्र चर्चा होती ती फक्त पावसाची. अनेक वारकरी 
मोबाईलवरून गावाकडे पावसाबाबत सतत विचारणा करताना दिसत होता. माऊली आळंदीतून 
निघाल्यावर पाऊस सुरू होईल, या आशेने उभ्या महाराष्ट्रातून आलेला बळीराजा पंढरीची 
वाट चालत होता. मात्र, वारीतील अर्ध्याहून अधिक अंतर गेल्यानंतरही सोहळ्यात पाऊस 
लागला नाही. त्यामुळे मनात विठुरायाची ओढ असली तरी विश्रांतीच्या वेळी काळ्या आईची 
आठवण आल्याशिवाय राहत नव्हती.&lt;br&gt;&lt;br&gt;काही ठिकाणी पावसाचा शिडकावा येत होता. मात्र, लगेच 
ऊन पडत असल्याने बळीराजा काळजीत होता. मात्र, मंगळवारपासून (ता.4) पालखी नातेपुतेत 
येत असताना सायंकाळी जोरदार पाऊस पडला. त्यानंतर दोन दिवस दिवसभरच्या वाटचालीत 
अधूनमधून उकाडा तर पावसाची सरी असा हवामानातील बदल वारकऱ्यांना जाणवत होता. कालही 
दुपारी पालखी निमगाव पाटीवर जेवणासाठी थांबली. मात्र, मधेच पाऊस पडल्याने 
वारकऱ्यांना हातात जेवण घेऊन जेवण उरकावे लागले. मात्र, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील 
पावसाबाबतची चिंता मात्र पुरती मिटली होती. सलग तीन दिवस पाऊस आल्याने 
वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आता बळीराजाची चिंता मिटली असून 
गावाकडच्या शेतातील पेरणी खुशाल करू, अशीच भावना लाडक्‍या विठुरायाकडे तो व्यक्त 
करत होता.&lt;br&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;</description>
            <pubDate>Fri, 08 Jul 2011 16:31:54 +0100</pubDate>
        </item>
        <item>
            <title>पालखी असते एक गजबजलेलं गाव...</title>
            <link>http://esakal.yolasite.com/news/category/resources/news/पालखी-असते-एक-गजबजलेलं-गाव-</link>
            <description>&lt;b&gt;अकलूज (पालखीमार्गावरून) -&lt;/b&gt;&amp;nbsp;जत्रा पांगते... पालं 
उठतात..कोरड्या जमिनीत उमाळे दाटतात... ही उक्ती पालखी मार्गावर मुक्कामाच्या 
ठिकाणी सर्रास अनुभवास येते आहे. शेकडो मैलावरून गेल्या पंधरा दिवसांपासून चालत 
येणाऱ्या वारकऱ्यांना लागणाऱ्या वस्तूंची विक्री करणारे अनेक दुकानेही त्यांना सोबत 
करीत असतात. वारकऱ्यांचा मुक्काम उठताच दुकानांची जागाही बदलते. पुढील मुक्कामाच्या 
जागी दुकानेही स्थलांतरित होतात.&lt;br&gt;&lt;br&gt;दाटलेल्या उमाळ्याची भावना मनात घेऊन 
वारकरी नव्या मुक्कामासाठी मार्गस्त होत असतात. अशा पालखी सोहळ्यातल्या गजबजलेल्या 
गावाची रेलचेल पंढरीच्या वाटेवर सध्या दिसत आहे. सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी 
लाखो भाविक पालखी मार्गावर चालत आहेत. या भक्तिमार्गावरील नव्या गावाची नवी नवलाई 
समोर येत आहे.&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;b&gt;&lt;i&gt;&lt;font style=&quot;color: rgb(255, 127, 0); &quot;&gt;पंढरीचा वास चंद्रभागे स्नान &lt;br&gt;आणिक दर्शन विठोबाचे&lt;br&gt;हेचि 
मज घडो जन्मो जन्मांतरी&lt;br&gt;मागणे श्रीहरी नाही दुजे...&lt;/font&gt;&lt;/i&gt;&lt;/b&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;या संतोक्तीप्रमाणे सावळ्या 
विठुरायाचे दर्शन अवघ्या पन्नास किलोमीटरवर राहिल्याने वारकऱ्यांच्या भावना उत्कट 
झाल्या आहेत. बळीराजा असणाऱ्या वारकऱ्यांचा पावसाच्या हजेरीने आनंद द्विगुणित झाला 
आहे. शेकडो मैलावरून मजल दरमजल करीत निघालेला भाविकांचा जथ्या मुक्कामाच्या गावी 
विसावताच सुरू होते पालखीतल्या गावाची गजबज.&lt;br&gt;&lt;br&gt;आई-बाप सोडून या पालखीतल्या 
तात्पुरत्या गावात सर्व काही मिळते बाबा...असे अंबाजोगाईहून आलेले वसंतराव काकडे 
यांनी सांगितले. ते म्हणाले, की दैनंदिन नित्यक्रमासाठी आवश्‍यक असणारे साबण, तेल, 
पावडर, कंगवापासून आरसा, पिण्याच्या पाण्याची बाटली, इतकेच नव्हे तर हॉटेलही या 
पालख्यांसोबतच असतात. दराची चौकशी करण्यासाठी वारकऱ्यांकडे वेळ नसतो, चढा दर असला 
तरी विठ्ठलकृपेने या वस्तू मिळतात, वेळ भागते एवढेच पाहायचे असते. वारकरी गाऱ्हाणं 
मांडत नाहीत कधी.&lt;br&gt;&lt;br&gt;दिंडीमालकाला गावातून निघतानाच ७०० रुपये प्रति वारकरी दिले 
जातात. मग संख्येनुसार ट्रक किंवा टेम्पो ठरवून &quot;रजिस्ट्रेशन' केलेल्या वारकऱ्यांचा 
जथ्था निघतो. दिंडीचालकावर चहा, जेवण व निवाऱ्यांची सोय करणे ही जबाबदारी असते, असे 
श्री. काकडे म्हणाले. इतर वैयक्तिक वस्तूंची गरज स्वत:च भागवावी लागते. &lt;br&gt;&lt;br&gt;दाढी, 
कटिंगसाठी रस्त्याच्या कडेला रिकाम्या बारदान्यावर दुकाने थाटली जातात. दाढी १० तर 
कटिंग २० रुपये असा दर आहे. चहा चार ते पाच रुपयांना, छोटा साबण पाच रुपयांना 
मिळतो. दिंडीतील हॉटेल छोट्या टेम्पोसारख्या वाहनातून सेवा देतात. खाद्यपदार्थांचे 
दर पाच रुपयांना चहा तर दहा रुपयांना नाष्टा असा आहे. ही लगबग मुक्कामाच्या जागी 
दिसून येते. सकाळी नव्या मुक्कामाच्या दिशेने निघालेली काही पावले जुन्या 
मुक्कामाच्या जागी क्षणभरासाठी रेंगाळतात खरी, मात्र खरी ओढ असते विठुरायाच्या 
दर्शनाची. मग मुखाने हरिनामाचा गजर करीत पावले चालत राहतात. एकूण काय, वारकऱ्यांचा 
अख्खा गाव संगतीने चालत असतो, जणू भक्तिमार्गावरचा रस्ता हेच एक गाव बनते. 
&lt;br&gt;वारकऱ्यांच्या मुखात मात्र शब्द असतात...&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;i&gt;&lt;b&gt;&lt;font style=&quot;color: rgb(255, 127, 0); &quot;&gt;दळिता कांडिता तुज गाईन अनंता&lt;br&gt;न 
विसंबे क्षणभरी, तुझे नाम गा मुरारी&lt;br&gt;नित्य हाचि कारभार मुखी हरी निरंतर...&lt;/font&gt;&lt;/b&gt;&lt;/i&gt;</description>
            <pubDate>Wed, 06 Jul 2011 16:51:17 +0100</pubDate>
        </item>
        <item>
            <title>अडीच लाख भाविक पंढरीत दाखल</title>
            <link>http://esakal.yolasite.com/news/category/resources/news/अडीच-लाख-भाविक-पंढरीत-दाखल</link>
            <description>&lt;b&gt;&lt;font style=&quot;color: rgb(255, 127, 0); &quot;&gt;मंदिर समितीचे ८ लाख लाडू बनविण्याचे काम युद्ध 
पातळीवर ! &lt;/font&gt;&lt;/b&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;पंढरपूर - आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात सुमारे अडीच लाख भाविक 
दाखल झाले आहेत. विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे. 
आषाढीची जय्यत तयारी सुरु आहे. मंदिर समितीचे 8 लाख बुंदीचे लाडू बनविण्याचे काम 
युद्ध पातळीवर सुरु केले आहे. सदाशिवनगर येथील पालखी सोहळ्यातील महत्त्वाचे रिंगण 
रद्द करण्यात आल्यामुळे, हजारो भाविकांची निराशा झाली. दरम्यान, आज संत तुकाराम 
महाराज पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणाने लाखो भाविकांना मंत्रमुग्ध केले. संत 
तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज (बुधवार) सोलापूर जिल्ह्यात थाटात आगमन झाले. 
&lt;br&gt;&lt;br&gt;सराटी फाटा येथे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात दाखल 
झाला. तुताऱ्यांची गगनभेदी आणि टाळ मृदुंगांचा गजर करत, सराटी फाट्यावरून नदी पार 
करून सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री 
लक्ष्मणराव ढोबळे यांनी जिल्ह्याच्या वतीने पालखीचे स्वागत केले. या प्रसंगी आमदार 
हणुमंत डोळस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे 
अध्यक्ष बळीराम काका साठे, राज्याच्या पाणी पुुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान 
सचिव धीरजकुमार, जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख राजेश प्रधान, 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव हरीदास, स्वच्छता विभागाचे समन्वयक 
रामदास धुमाळे, समन्वयक गणेश खेडकर उपस्थित होते. &lt;br&gt;तुकारोबारायांचा पालखी सोहळा 
सदाशिवराव माने महाविद्यालयाच्या पटांगणात दाखल झाला. त्यानंतर गोल रिंगण लावण्यात 
आले. अश्‍वाने चौफेर उधळण करीत ऐटदारपणे चालत गर्दीमधून धूम ठोकली. क्षणार्धात 
गोलाकार वेढे घेत गोल रिंगण पूर्ण केले. घोड्याच्या पायाला लागलेली धूळ मस्तकी 
लावण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. कुणी घोड्याच्या अंगावर खारीक-खोबरे 
उधळण्यात दंग होते. &lt;br&gt;&lt;br&gt;&lt;b&gt;&lt;font style=&quot;color: rgb(255, 127, 0); &quot;&gt;पंढरीत भाविकांचा ओघ सुरूच&lt;/font&gt; &lt;/b&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;पंढरपुरात रेल्वे 
आणि एसटी बसने बुधवारी एक लाखापेक्षा अधिक भाविक दाखल झाले आहेत. शहरात आतापर्यंत 
अडीच ते तीन लाख भाविक आल्याचे शहर प्रशासनाने सांगितले. दर्शन बारीत सहभागी 
होण्यासाठी त्यांनी रांग लावण्यास सुरवात केली आहे. संतांच्या सर्व पालख्यांचे 
जिल्ह्यात आगमन झाल्यामुळे, पंढरपुराकडे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. 
भाविक मोठ्या प्रमाणावर पालखी सोहळ्यातून पंढरीत येऊन परत पालखी सोहळ्यात सहभागी 
होण्यासाठी जात आहेत. &lt;br&gt;&lt;br&gt;&lt;font style=&quot;color: rgb(255, 127, 0); &quot;&gt;&lt;b&gt;पावसामुळे रांगेतील भाविकांचे हाल &lt;/b&gt;&lt;/font&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;पावसामुळे 
दर्शन रांगेतील भाविकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. तात्पुरत्या स्वरूपात 
उभारलेल्या दर्शन रांगेचा फटका हजारो भाविकांना बसला. पावसामुळे भाविकांची ना घर का 
ना घाटका, अशी स्थिती झाली. परंतु मनात दर्शनाची ओढ कायम असल्यामुळे भाविकांना 
दर्शन रांग सोडली नाही. &lt;br&gt;&lt;br&gt;&lt;b&gt;&lt;font style=&quot;color: rgb(255, 127, 0); &quot;&gt;८ लाख बुंदीचे लाडू..! &lt;/font&gt;&lt;/b&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;श्री 
विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने 8 लाख बुंदीचे लाडू तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर 
मोहीम सुरू केली आहे. भक्त निवासातील मुदपाकखान्यात लाडू बनविण्याचे काम सुरू आहे. 
दहा रुपयांना दोन लाडू, या प्रमाणे ना नफा ना तोटा या धर्तीवर विक्री चालू झाली 
आहे. जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यापासून, प्रशासन 
गतिमान झाले आहे. डॉ. पाटील यांनी &quot;व्हीआयपी' दर्शनावर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे 
मधून दर्शन घेणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. &lt;br&gt;&lt;br&gt;&lt;b&gt;&lt;font style=&quot;color: rgb(255, 127, 0); &quot;&gt;अत्याधुनिक मोबाईल टॉयलेट&lt;/font&gt;&lt;/b&gt; 
&lt;br&gt;&lt;br&gt;पालखी सोहळ्यासमवेत पुणे विभागाय आयुक्त कार्यालयाने बनविलेली दोन &quot;मोबाईल 
टॉयलेट' भाविकांच्या सेवेत दाखल झाली आहेत. या &quot;मोबाईल टॉयलेट'मुळे भाविकांची 
चांगली सोय झाली आहे. सोबत पाण्याचा टॅंकर देण्यात आल्यामुळे, कुठेही अडचण निर्माण 
होणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.</description>
            <pubDate>Wed, 06 Jul 2011 16:26:37 +0100</pubDate>
        </item>
        <item>
            <title>तुकोबांच्या पालखी स्वागतासाठी ...</title>
            <link>http://esakal.yolasite.com/news/category/resources/news/तुकोबांच्या-पालखी-स्वागतासाठी-बारामती-सज्ज</link>
            <description>&lt;b&gt;वारकऱ्यांच्या सेवेची दालने 
गुरुवारपासूनच सजली&lt;/b&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;बारामती - संतश्रेष्ठ 
तुकाराम महाराजांच्या पालखीसोहळ्याच्या स्वागतासाठी बारामती नगरी सज्ज झाली असून, 
ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासह वारकऱ्यांच्या सेवेची विविध दालने गुरुवारपासूनच 
सजलेली होती. शुक्रवारी (ता. 1) तुकाराम महाराजांच्या पालखीचा बारामतीत मुक्काम 
आहे.&lt;br&gt;&lt;br&gt;बारामती शहरात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पालखीचे आगमन होते. 
शहराच्या वेशीवर नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, उपनगराध्यक्षा पौर्णिमा तावरे 
यांच्यासह नगरसेवक, शासकीय अधिकारी व मान्यवर पालखीचे स्वागत करतील. यंदाही 
पांढरीच्या महादेवाच्या मंदिरानजीक बारामती नगरपालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज 
पालखी सोहळ्याचे भक्तिभावाने स्वागत केले जाणार आहे.&amp;nbsp;&lt;br&gt;&lt;br&gt;नगरपालिकेच्या वतीने दरवर्षी 
वीणेकऱ्यांचा नारळ व पुष्पहार देऊन स्वागत केले जाते, यंदाही अशाच पद्धतीने स्वागत 
केले जाणार आहे. &lt;br&gt;दरम्यान, पालखीमार्गावरील दुरुस्ती व डागडुजीची कामे 
युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली असून, वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार 
नाही, याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेतली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी 
विजयसिंह देशमुख व मुख्याधिकारी रवी पवार यांनी दिली. पालखी काळात कोणताही अनुचित 
प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती उपविभागीय 
पोलिस अधिकारी नामदेव मिट्टेवाड व पोलिस निरीक्षक गणेश मोरे यांनी दिली. शहरात 
स्वच्छता मोहीम पूर्ण करण्यात आली असून, वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचीही 
व्यवस्था करून देण्यात आली आहे.&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;b&gt;वारकऱ्यांसाठी अभिनव कार्ड&lt;/b&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;span class=&quot;yui-non&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/span&gt;बारामतीचे उपविभागीय अधिकारी विजयसिंह देशमुख यांनी यंदा दिंडीप्रमुखांना 
केरोसीन व गॅस सिलिंडरची अडचण होऊ नये, यासाठी स्वतंत्र कार्डच छापून दिले आहे. यात 
दौंड, बारामती व इंदापूर तिन्ही तालुक्‍यातील स्वस्त धान्य दुकानदार व 
गॅसविक्रेत्यांचे दूरध्वनी क्रमांक व त्यांचे पत्ते टाकण्यात आले आहेत. या कार्डवर 
किती लिटर केरोसीन वाटप झाले व किती गॅस सिलिंडर वाटप झाले याची माहिती भरून 
द्यायची आहे. या मुळे दिंडीप्रमुखांची सोय होणार आहे.</description>
            <pubDate>Thu, 30 Jun 2011 16:22:54 +0100</pubDate>
        </item>
        <item>
            <title>माउलींच्या पादुकांना शुक्रवारी ...</title>
            <link>http://esakal.yolasite.com/news/category/resources/news/माउलींच्या-पादुकांना-शुक्रवारी-नीरा-स्नान</link>
            <description>&lt;span class=&quot;Apple-style-span&quot; style=&quot;font-family: Georgia, 'Times New Roman', Times, serif; -webkit-border-horizontal-spacing: 2px; -webkit-border-vertical-spacing: 2px; line-height: normal; &quot;&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot;&gt;&lt;b style=&quot;color: rgb(39, 25, 21); font-size: 14px; &quot;&gt;पुणे जिल्ह्यातील प्रवास संपवून सातारा जिल्ह्यात प्रवेश होणार&amp;nbsp;&lt;/b&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;/font&gt;&lt;div style=&quot;color: rgb(39, 25, 21); font-size: 14px; &quot;&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot; color=&quot;#000000&quot; size=&quot;3&quot;&gt;विलास काटे - सकाळ वृत्तसेवा&amp;nbsp;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;/font&gt;&lt;/div&gt;&lt;div style=&quot;color: rgb(39, 25, 21); font-size: 14px; &quot;&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot; color=&quot;#000000&quot; size=&quot;3&quot;&gt;वाल्हे - महर्षी वाल्मीकींची तपोभूमी असलेल्या वाल्हे गावात घरोघरी गुढ्या-तोरणे उभारून माउलींच्या पालखीचे आज उत्साहात स्वागत करण्यात आले. गर्द हिरव्या वनराईच्या सान्निध्यात भगव्या पताका उंचावून हरिनामाचे गोडवे गात वारकऱ्यांनी वाटचाल केली. शुक्रवारी (ता. १) पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील प्रवास संपवून नीरा स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;/font&gt;&lt;/div&gt;&lt;div style=&quot;color: rgb(39, 25, 21); font-size: 14px; &quot;&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot; color=&quot;#000000&quot; size=&quot;3&quot;&gt;माउलींचा पालखी सोहळा सकाळी साडेसहाच्या सुमारास मल्हारनगरीतून बाहेर पडला. औद्योगिक विभागातून सोहळा बाहेर पडल्यानंतर न्याहारीसाठी दौंडजच्या खिंडीत अर्धा तास थांबला. हिरव्या गार माळरानात भक्तिरसाबरोबर निसर्गाचाही आस्वाद घेतला. पुढे दौंडज ग्रामस्थांच्या वतीने माउलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.&amp;nbsp;&lt;br&gt;वाल्हे गावचा परिसर भाजीपाला पिकविणारा म्हणून ओळखला जातो. बागायती मळे पाहून विठुरायाचा भक्त संत सावता माळी यांची आठवण होते. &quot;कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी' असा संत सावतांचा अभंग वारकरी गात होते.&amp;nbsp;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;/font&gt;&lt;/div&gt;&lt;div style=&quot;color: rgb(39, 25, 21); font-size: 14px; &quot;&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot; color=&quot;#000000&quot; size=&quot;3&quot;&gt;वाल्ह्याच्या सीमेपासून ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेतली. रांगोळ्यांच्या पायघड्या आणि गुढ्या उभारून पालखीचे स्वागत करण्यात आले. गावातून पालखी जाताना ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर पालखी पुन्हा रथात ठेवण्यात आली. साडेबाराच्या सुमारास पालखी तळावर पोचली. तळावर क्रमांकानुसार दिंड्या लागल्या. गर्दीतून वाट काढीत पालखी मधोमध आली. त्या वेळी दिंड्यांमध्ये भजन सुरू होते. राजाभाऊ चोपदार यांनी चोप उंचावताच दिंड्यांमध्ये शांतता पसरली. एका&amp;nbsp; दिंडीने टाळ सुरूच ठेवले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही टाळ वाजविणे बंद केले. त्यानंतर परिसरात सर्वत्र शांतता पसरली. परंपरेप्रमाणे चोपदारांनी आवश्‍यक त्या सूचना दिल्या अन्‌ समाजआरती झाली. दुपारचे जेवण घेऊन वारकऱ्यांनी विसावा घेतला. सायंकाळी दिंड्यांमध्ये प्रवचन, कीर्तन सुरू होते.&lt;/font&gt;&lt;/div&gt;&lt;/span&gt;</description>
            <pubDate>Thu, 30 Jun 2011 15:43:09 +0100</pubDate>
        </item>
        <item>
            <title>तुकाराम महाराज पालखीचे उंडवडी सुपे ...</title>
            <link>http://esakal.yolasite.com/news/category/resources/news/तुकाराम-महाराज-पालखीचे-उंडवडी-सुपे-येथे-स्वागत</link>
            <description>उंडवडी -: 
जगत्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज (ता. ३०) रोजी गुरुवारी सायंकाळी 
साडेसहाच्या सुमारास दौंड तालुका पार करून बारामती तालुक्‍यात प्रवेश केला. या 
पालखी सोहळ्याचे तालुक्‍यातील पदाधिकारी व भाविकांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत 
केले. स्वागतानंतर भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा उंडवडी सुपे येथे मुक्कामी 
विसावला.&lt;br&gt;&lt;br&gt;जगत्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळाने दौंड तालुक्‍यातील अवघड 
रोटी घाट पार करून बारामती तालुक्‍यात प्रवेश केला. या पालखी सोहळ्याचे कारखेल 
हद्दीतील खराडेवाडी नजीक (गुंजखिळा) येथे तालुक्‍याच्या वतीने बारामती पंचायत 
समितीचे सभापती अविनाश गोफणे, प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, गटविकास अधिकारी 
विवेक इलमे, तहसीलदार हिंमत खराडे यांनी प्रथम स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा 
परिषदेचे सदस्य बी. के. हिरवे, उपसभापती प्रभावती काटे, उपविभागीय पोलिस अधिकारी 
नामदेव मिठेवाड, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अंकुश रसाळ, राष्ट्रवादी युवकचे 
तालुकाध्यक्ष विक्रम भोसले, कारखेलच्या सरपंच नलिनी भापकर, उपसरपंच अनिल भोसले, 
उंडवडी सुपेच्या सरपंच लता गवळी, उपसरपंच भरत जगताप व विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ 
मोठ्या संख्येने उपस्थित होते.&lt;br&gt;&lt;br&gt;पालखी सोहळ्याचे फटाके वाजवून स्वागत करण्यात 
आले, तसेच या सोहळ्याच्या स्वागतासाठी कारखेल व उंडवडी सुपे ग्रामपंचायतीच्या वतीने 
स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. वारकऱ्यांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली 
होती. उंडवडी सुपे येथे पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. येथे आरती करून 
गेनबा तुकारामाचा गजर करीत पालखी विसावली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील 
उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, साबळेवाडी, जराडवाडी, शिर्सुफळ, देऊळगाव रसाळ 
आदी गावातील भाविकांनी गर्दी केली होती.</description>
            <pubDate>Thu, 30 Jun 2011 15:35:41 +0100</pubDate>
        </item>
        <item>
            <title>नीरेत पालखीची तयारी पूर्ण</title>
            <link>http://esakal.yolasite.com/news/category/resources/news/नीरेत-पालखीची-तयारी-पूर्ण</link>
            <description>&lt;b&gt;ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचे उद्या नीरा 
स्नान&lt;/b&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;नीरा - नीरा (ता. पुरंदर) येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी 
सोहळा शुक्रवारी (ता. १) येत आहे. ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचे नीरा स्नान 
येथे पार पडेल. सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून जय्यत 
तयारी करण्यात आल्याची माहिती सरपंच राजेश काकडे व ग्रामसेवक डी. टी. लोणकर यांनी 
दिली.&lt;br&gt;&lt;br&gt;आळंदीहून निघालेला पालखी सोहळा माउलींचा या पादुका स्नानानंतर सातारा 
जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी विविध मान्यवरांची, अधिकाऱ्यांची 
मोठी गर्दी असते. पुणे जिल्ह्यातून पालखीला निरोप देण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे 
पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहतात. नीरा नदीच्या पलीकडील तीरावर सातारा 
जिल्ह्यातील अधिकारी-पदाधिकारी सोहळ्याचे स्वागत करतात. त्यामुळे येथे सोहळ्याला 
अलोट गर्दी लोटते. सोहळ्याला होणारी गर्दी विचारात घेऊन ग्रामपंचायतीने नियोजन 
केल्याचे श्री. काकडे यांनी सांगितले.&lt;br&gt;&lt;br&gt;नीरेमध्ये पालखी विसावा तळाची रंगरंगोटी 
करण्यात आली आहे. तेथील परिसराची स्वच्छता आठ दिवसांपूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे. 
गावातील गटारांची स्वच्छता करून त्यामध्ये पावडर टाकण्यात आली आहे. डासांचा उपद्रव 
होऊ नये, साथीच्या आजाराला अटकाव व्हावा, यासाठी सर्वत्र धुरळणी करण्यात आली आहे. 
पुणे-पंढरपूर मुख्य मार्गावरील साईडपट्ट्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुरूम 
टाकण्यात आला आहे. नीरा ग्रामपंचायतीने गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण 
केली आहे. रस्त्यावर काही ठिकाणी पाइपलाइन फुटली होती. तेथे दुरुस्ती करण्यात आली 
असून, मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे.&lt;br&gt;&lt;br&gt;बाजारतळ परिसरातही स्वच्छतेची 
कामे पूर्ण करून मुरूम टाकून घेण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची 
व्यवस्था व्हावी, यासाठी मुख्य मार्गावर सात ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नळकोंडाळी 
सुरू करण्यात आली आहेत. पालखी सोहळ्यातील टॅंकर पाण्याने भरून देण्याची व्यवस्था 
नीरेतील जलशुद्धीकरण केंद्रावर करण्यात आली आहे. विविध समाजसेवी संस्थांकडूनही 
पालखी मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात येत आहेत. वारकऱ्यांना अन्नदान करण्याबरोबरच 
कोणत्याही बाबीची कमी पडू नये, अशा प्रकारचे नियोजन परिसरात होत असल्याचे श्री. 
काकडे यांनी स्पष्ट केले.</description>
            <pubDate>Wed, 29 Jun 2011 16:18:52 +0100</pubDate>
        </item>
        <item>
            <title>माउलींच्या स्वागतासाठी वाल्हे सज्ज</title>
            <link>http://esakal.yolasite.com/news/category/resources/news/माउलींच्या-स्वागतासाठी-वाल्हे-सज्ज</link>
            <description>&lt;b&gt;पालखीचे आज आगमन, महर्षी वाल्मीकी दिंडीचा 
सहभाग&lt;/b&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;सोमेश्‍वरनगर - वाल्हे येथे उद्या (ता. ३०) दुपारी महर्षी 
वाल्मीकी ऋषींच्या भेटीस संतश्रेष्ठ ज्ञानदेवांचा पालखी सोहळा येणार आहे. पालखीच्या 
स्वागतासाठी वाल्ह्याच्या बारा वाड्यांतील ग्रामस्थ सज्ज झाले असून, वारकऱ्यांचे 
गुढ्या उभारून स्वागत होणार आहे. याच गावात पालखीचा गावप्रदक्षिणा सोहळा पार पडणार 
आहे.&lt;br&gt;&lt;br&gt;वाल्हे गावात वाल्मीकी ऋषींची समाधी आहे. या प्राचीन गावात ज्ञानदेवांची 
पालखी दर वर्षी मुक्कामी असते. पालखी उद्या दुपारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान 
वाल्हे गावात प्रवेश करणार आहे. ग्रामस्थ व पदाधिकारी त्यांचे स्वागत करणार असून, 
त्यानंतर पालखीचा ग्रामप्रदक्षिणा सोहळा पार पडणार आहे. ग्रामप्रदक्षिणेचा मान 
असणारे वाल्हे हे पुणे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. प्रदक्षिणेनंतर पालखी तळाकडे 
जाऊन विसावणार आहे. या ठिकाणी परिसरातील भाविकांसाठी दर्शनाची सोय केली आहे. 
वारकऱ्यांसाठी शाळा, विद्यालय, धर्मशाळा, मंदिरे, मोकळ्या इमारती निवासासाठी स्वच्छ 
करून ठेवल्या आहेत. महर्षी वाल्मीकी ऋषींच्या समाधीच्या दर्शनाची सोय केली गेली 
आहे. घरोघरी त्यांच्यासाठी भोजनाची सोय केली जाणार आहे.&lt;br&gt;&lt;br&gt;प्रशासनाने गावापासून 
दोन किलोमीटर अंतरावर मोकळ्या पटांगणात पालखी तळ तयार केला आहे. प्रशासन व 
पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांतून गावाला जिल्हा परिषदेकडून तेराव्या वित्त आयोगातून 
एक लाख रुपये पालखी सोहळा निधी प्राप्त झाल्याने ग्रामपंचायतीने समाधान व्यक्त केले 
आहे. गेल्या वर्षात एक रुपयाही निधी मिळाला नव्हता. यातून पालखी मुक्कामाच्या 
परिसरात धुरळणी केली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ३२ विहिरी आरक्षित करण्यात आल्या 
आहेत. आरोग्य विभागाने हॉटेल, खाद्य पदार्थांचे गाडे, फळविक्रेते यांना सूचना 
दिल्या असून, आरोग्य सुविधांसाठी पथक तयार ठेवले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून 
आठ फिरती शौचालये उपलब्ध झाली असून, वीज वितरण कंपनीनेही पालखी तळासाठी खास दोन 
टॉवर उभे करून वीज पुरविली आहे.&lt;br&gt;&lt;br&gt;रस्त्याच्या कडेनेही विजेची सोय केली आहे, अशी 
माहिती सरपंच दत्तात्रेय पवार यांनी दिली. जिल्हा बॅंकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, 
सरपंच श्री. पवार, उपसरपंच समदास भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य अमोल खवले, पोपट पवार, 
चंद्रशेखर दुर्गाडे, अंकुश दुर्गाडे, प्रशांत दोशी आदी जबाबदार मंडळी समक्ष पाहणी 
करत आहेत. उद्या पालखीमध्ये वाल्हे गावाचा महर्षी वाल्मीकी नावाची दिंडी सहभागी 
होणार आहे. या दिंडीसाठी ग्रामस्थांनी आकर्षक रथ दिला आहे.</description>
            <pubDate>Wed, 29 Jun 2011 16:14:12 +0100</pubDate>
        </item>
        <item>
            <title>रंगदास स्वामी पायी दिंडीचे ...</title>
            <link>http://esakal.yolasite.com/news/category/resources/news/रंगदास-स्वामी-पायी-दिंडीचे-पंढरपूरकडे-प्रस्थान</link>
            <description>बेल्हे - आणे (ता. 
जुन्नर) येथील श्री रंगदास स्वामी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे आज ता. २९ रोजी 
सकाळी टाळ - मृदंगाच्या गजरात अतिशय भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. 
दरम्यान, वडगाव दर्या - राशीन - टेंभुर्णीमार्गे हा पायी दिंडी सोहळा ता. ११ जुलै 
रोजी पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहे.&lt;br&gt;&lt;br&gt;श्रीक्षेत्र आणे ते पंढरपूर या पायी दिंडी 
सोहळ्याचे नेतृत्व रामदास महाराज दाते (अण्णा) करीत आहेत. या पायी दिंडी 
सोहळ्यामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी आणे पंचक्रोशी, मुंबईकर भाविक मंडळींचा सहभाग 
आहे. या दिंडी सोहळ्यासाठी राणू रामजी दाते यांनी ट्रक सुविधा, श्रीप्रकाश बोरा 
यांनी पाण्याचा टॅंकर, तर बबन तुकाराम गांडाळ यांनी ट्रॅक्‍टरसेवा विनामोबदला 
उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, चांगुणाबाई दाते, वसंत तुकाराम आहेर, बाबाजी दाते, 
जालिंदर नेहे, विष्णुबुवा आहेर, इटकाई देवस्थान आदींच्या आर्थिक सहकार्याने आकर्षक 
रथ तयार करण्यात आला आहे, तर माजी सरपंच विलास दाते यांनी वारकऱ्यांना पावसापासून 
संरक्षणासाठी प्लॅस्टिक मॅट, घोंगड्यांचे मोफत वाटप केले.</description>
            <pubDate>Wed, 29 Jun 2011 16:08:25 +0100</pubDate>
        </item>
    </channel>
</rss>
