<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<!-- generator="FeedCreator 1.7.2" -->
<rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
    <channel>
        <atom:link href="http://esakal.yolasite.com/%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/tag/ईसकाळ-विशेष.rss" rel="self" type="application/rss+xml" />
        <title>ईसकाळ-विशेष</title>
        <description>ईसकाळ-विशेष</description>
        <link>http://esakal.yolasite.com/%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/tag/ईसकाळ-विशेष.php</link>
        <lastBuildDate>Sat, 13 Jun 2026 09:28:29 +0100</lastBuildDate>
        <generator>FeedCreator 1.7.2</generator>
        <item>
            <title>पाऊले चालती पंढरीची वाट...</title>
            <link>http://esakal.yolasite.com/%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/tag/ईसकाळ-विशेष/पाऊले-चालती-पंढरीची-वाट-</link>
            <description>&lt;span class=&quot;Apple-style-span&quot; style=&quot;font-size: 15px; line-height: 25px; &quot;&gt;&lt;span style=&quot;font-style: italic; &quot;&gt;&lt;font style=&quot;color: rgb(191, 95, 0); &quot;&gt;&lt;b&gt;चार वर्षांपूर्वी &quot;विठ्ठल-विठ्ठल&quot; या ब्लॉगच्या माध्यमातून ई-सकाळने पहिली इंटरनेट वारी केली. इंटरनेट वारीची संकल्पना सकाळने सर्वप्रथम रुजवली. त्याला वाचकांनी धो-धो प्रतिसादही दिला. परदेशी वाचकांसाठी तर ही पर्वणीच होती. वारीत चालताना येणारे वारकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवित असतो. ते चांगल्या-वाईट दोन्ही प्रकारचे असतात. यंदाही असेच अनुभव मी आपणासमवेत &quot;शेअर&quot; करणार आहे. त्यामुळे तुम्हीही न चुकता रोज पाहा, अन्‌ वारीत सहभागी झाल्याचा अनुभव घ्या.&lt;/b&gt;&lt;/font&gt;&lt;/span&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot; face=&quot;Mangal, Verdana&quot;&gt;&lt;b&gt;&lt;/b&gt;&lt;/font&gt;&lt;span style=&quot;font-family: Mangal, Verdana; font-weight: bold; &quot;&gt;गोल रिंगण पाहण्याची संधी&lt;/span&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot; face=&quot;Mangal, Verdana&quot;&gt;तुकोबारायांनी काल देहू सोडलं. रात्री त्यांचा मुक्काम आकुर्डीत होता. उद्योगनगरीत भाविक मोठ्या मनानं या सोहळ्याचे स्वागत करतात. तिथी वाढल्यामुळे उद्योगनगरीतील भाविकांना तुकोबारायांच्या पालखीचा दोन दिवस सहवास लाभणार आहे. त्यात आतापर्यंत काळातील ऐतिहासिक निर्णय मानला पाहिजे, तो पिंपरीत होणाऱ्या रिंगणाचा... होय तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात यंदा प्रथम पुण्याच्या परिसरात गोल रिंगण करण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. दिवस वाढल्याने पुणे, पिंपरीतील भाविकांनाही रिंगण सोहळ्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने यंदा पिंपरी मुक्कामाच्या पूर्वी म्हणजे आज दुपारी चार वाजता सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होणार आहे. नेहमी या भागातील मंडळींना रिंगण पाहावे लागते ते दूरचित्रवाणीवर. पण यंदा हा रिंगणाचा आनंद प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे.&lt;/font&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;span style=&quot;font-family: Mangal, Verdana; font-weight: bold; &quot;&gt;माऊली निघाली&lt;/span&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot; face=&quot;Mangal, Verdana&quot;&gt;होय, रात्री बाराच्या सुमारास माऊलींच्या पालखीने पंढरपूरकडं प्रस्थान ठेवलंय. दरवर्षी चार वाजता असणारं प्रस्थान रात्री कसं काय हा प्रश्‍न आपल्याला पडला असेल. त्याचं काय झालंय. माऊलींच्या मंदिरात दर गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास परंपरेची पालखी निघते. ती मंदिर प्रदक्षिणा करून पुन्हा मंदिरात येते. यंदाच्या प्रस्थानचा दिवसही गुरुवारच आलाय. त्यामुळं मंदिरात प्रथम परंपरेनुसार पालखी प्रदक्षिणा झाली. त्यानंतर साडेआठच्या सुमारास सुरू झाला माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा. प्रथम रथापुढील २७ आणि रथामागील २० दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात आला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दहाच्या सुमारास परंपरेप्रमाणे शितोळे सरकारांचे अश्‍व देऊळवाड्यात आले. माऊलींच्या समाधीसमोर हैबतबाबांचे वंशज राजाभाऊ आरफळकर यांनी आरती केली. त्यानंतर देवस्थानच्या वतीने आरती करण्यात आली. त्यानंतर देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त प्रशांत सुरू यांनी पादुका वीणा मंडपात सजवून ठेवलेल्या पालखीत ठेवल्या. त्यानंतर प्रथम हैबतबाबा आणि नंतर देवस्थानच्या वतीने मानाचे नारळ देण्यात आले. त्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास &quot;माऊली-माऊली' असा जयघोष करीत आळंदीकरांनी माऊलींची पालखी खांद्यावर घेतली ती नाचवली. बाहेर देऊळवाड्यात दिंड्यांमधून निरनिराळे खेळ सुरू होते. माऊली निघाल्याने सोहळा सुरू झाल्यानं वारकऱ्यांच्या आनंदाला उधान आले होते. अशाच उत्साही वातावरणात माऊलींच्या पालखी सोहळ्याने रात्री उशिरा देऊळवाड्याजवळील आजोळघरी विसावा घेतला.&lt;/font&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;span style=&quot;font-family: Mangal, Verdana; font-weight: bold; &quot;&gt;एक दिवस अधिक मुक्काम&lt;/span&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot; face=&quot;Mangal, Verdana&quot;&gt;यंदा आणखी एक बदल आहे. तिथी वाढल्यामुळे यंदा आळंदीतील एक मुक्काम वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आज पालखी आळंदीतच मुक्काम करेल आणि शनिवारी सकाळी पुण्याकडे वाटचाल सुरू करेल. त्यामुळे माऊलींच्या आळंदीत वारकऱ्यांना एक दिवस अधिक राहायला मिळणार आहे.&lt;/font&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;span style=&quot;font-family: Mangal, Verdana; font-weight: bold; &quot;&gt;लाखो वारकऱ्यांचे इंद्रायणीत स्नान&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;/span&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot; face=&quot;Mangal, Verdana&quot;&gt;गेल्या तीन दिवसांपासून लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने आळंदी गजबजून गेली आहे. वारकऱ्यांसाठी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ती दुथडी भरून वाहत आहे. वारकऱ्यांनी इंद्रायणीचा काठ फुलून गेला आहे. आळंदीच्या सुमारे पाच किलोमीटरच्या अंतरात वारकऱ्यांच्या राहुट्या पडल्या आहे. प्रत्येक दिंड्यांमध्ये हरिनामाचा गजर सुरू आहे. त्यामुळे अवघी अंलकापुरी दुमदुमून गेली आहे. सध्या तरी पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे वारकऱ्यांना तो अजून तरी गैरसोयीचा ठरत नाही. अर्थांत त्या गैरसोईची वारकरी कधीच चिंता करीत नाही.&lt;/font&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;span style=&quot;font-family: Mangal, Verdana; font-weight: bold; &quot;&gt;ही खरी वारी&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;/span&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot; face=&quot;Mangal, Verdana&quot;&gt;घरची परंपरेची वारी चुकू न देण्यासाठी उभा महाराष्ट्र आळंदी जमलाय. संसारातील कामांचा व्याप संपवून अथवा बाजूला सारून माऊलीसोबत वारीत सहभागी व्हायचं हा ध्यास मनात बाळगत ही वारकरी मंडळी आळंदीत आली आहेत. माऊलीसोबत वारीत सहभागी व्हायचं. उन, वारा, पाऊस या तमा न बाळगता हरिनामाचे गोडवे गात वाटचाल करायची. अठरा वीस दिवस चालून पंढरीत जायचं. तेथे आषाढी एकादशीला चंद्रभागेचं स्नान करायचं, नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं. मंदिर प्रदक्षिणा करून कळस दर्शन घ्यायची. अन्‌ आपली वारी विठुरायाच्या चरणी रूजू करायची. मागणं काय मागायचं. &quot;विठुराया माझी वारी चुकू देऊ नकोस'. ही खऱ्या वारकऱ्यांची परंपरा. काय भावना आहे, मंडळी&lt;/font&gt;&lt;br&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot; face=&quot;Mangal, Verdana&quot;&gt;काही माणसं देवळात जातात, ती काही तरी संसारासाठी मागण्यासाठी. मात्र, या मंडळींना वारीच्या वाटेवर माऊलीसोबत मिळणारा आनंदच सर्व काही देवून जातो, त्यामुळंच त्यांना विठुरायाकडे मागण्यासारखं राहत नसावं. असं मला तरी वाटत. तुमचं मतही असंच असावं. &quot;राम कृष्ण हरी&quot;....&lt;/font&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;font class=&quot;Apple-style-span&quot; face=&quot;Mangal, Verdana&quot;&gt;भेटूया...&lt;/font&gt;&lt;/span&gt;</description>
            <pubDate>Fri, 24 Jun 2011 09:11:23 +0100</pubDate>
        </item>
    </channel>
</rss>
